शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
4
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
5
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
6
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
7
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
8
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
9
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
10
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
11
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
12
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
13
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
14
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
15
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
16
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
17
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
18
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
19
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
20
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर

जयसिंगपूरच्या जॅकवेलला अखेर मुहूर्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2017 00:28 IST

जयसिंगपूर : तब्बल पाच महिन्यांनंतर शहरातील पाणीपुरवठा योजना पूर्णवेळ सक्षम करण्यासाठी सध्या अस्तित्वात असलेल्या पाणीपुरवठा यंत्रणेची सुधारणा व बळकटीकरण करण्यासाठी

ठळक मुद्दे शहराला २४ तास पाणीपुरवठा करण्याचा मानस दाखवून पदाधिकाºयांनी योजनेसाठी निधी मंजूर उशिरा का होईना निधी निघाल्यामुळे शहराच्या मूलभूत प्रश्नांसाठी हा निधी मार्गी लागावा तब्बल पाच महिन्यांनंतर या कामाची प्रत्यक्षात निविदा निघाली

संदीप बावचे ।जयसिंगपूर : तब्बल पाच महिन्यांनंतर शहरातील पाणीपुरवठा योजना पूर्णवेळ सक्षम करण्यासाठी सध्या अस्तित्वात असलेल्या पाणीपुरवठा यंत्रणेची सुधारणा व बळकटीकरण करण्यासाठी वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत सुमारे एक कोटी ५१ लाख रुपयांची निविदा अखेर निघाली. नवीन जॅकवेल बांधकामासाठी निधी मंजूर झाला होता. मात्र, गेल्या पाच महिन्यांपासून हा निधी कागदावरच राहिल्याचे चित्र होते. प्रशासकीय मंजुरीअभावी आणि तांत्रिक अडचणीमुळे या कामाची निविदा निघालेली नव्हती. उशिरा का होईना निधी निघाल्यामुळे शहराच्या मूलभूत प्रश्नांसाठी हा निधी मार्गी लागावा, ही अपेक्षा शहरवासीयांतून व्यक्त केली जात आहे.

शहराला मुबलक पाणीपुरवठा व्हावा, यासाठी शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत ११ मे २०१७ ला शासनाने निधी मंजूर केला होता. या निधीतून नवीन जॅकवेल बांधणे, त्याचबरोबर कनेक्टिंग पाईप यासह अन्य कामांसाठी हा निधी मंजूर झाला होता. पन्नास वर्षांपूर्वी शहराला पाणीपुरवठा करणारी यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली होती. शहराला २४ तास पाणीपुरवठा करण्याचा मानस दाखवून पदाधिकाºयांनी योजनेसाठी निधी मंजूर केल्याचे सांगितले होते. शासनाकडून निधी मंजूर झाल्यानंतर गेल्या पाच महिन्यांपासून वैशिष्ट्यपूर्ण योजनेतील सुमारे दोन कोटी दहा लाख रुपयांचा हा निधी कागदावरच राहिल्याचे चित्र होते.

प्रशासकीय मंजुरीअभावी अंतिम प्रस्ताव मंजुरीचे काम रखडल्याचे सांगण्यात आले होते. दरम्यान,दोन कोटी दहा लाख रुपयांचानिधी वैशिष्टपूर्ण योजनेतून मंजूर झाला असला तरी कामाच्या तांत्रिक माहितीनुसार एक कोटी ५१ लाखांची निविदा या कामासाठी निघाली आहे.‘लोकमत’चा पाठपुरावाजयसिंगपूरमध्ये नवीन जॅकवेलचा निधी कागदावरच या मथळ्याखाली ‘लोकमत’ने जुलै २०१७ मध्ये वृत्त प्रसिद्ध केले होते. शासनाकडून निधी मिळतो. मात्र, त्याचा पाठपुरावा होत नाही. असाच प्रकार पालिकेत दिसून येत होता. याबाबत प्रशासन व लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधले होते. अखेर जॅकवेलच्या कामाची निविदा निघाली आहे. येणाºया काळात ही योजना पूर्ण करण्यासाठी ‘लोकमत’चा पाठपुरावा निश्चितच राहणार आहे.आघाड्यांची जबाबदारीनवीन जॅकवेलच्या निधीवरून शाहू व ताराराणी आघाडीत श्रेयवाद रंगला होता. दोन्ही आघाड्यांतून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप रंगले होते. तब्बल पाच महिन्यांनंतर या कामाची प्रत्यक्षात निविदा निघाली आहे. त्यामुळे येणाºया काळात दोन्ही आघाड्यांकडून पाणीपुरवठा योजना सक्षम करण्यासाठी व या निधीतून हे काम मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा व्हावा, अशी मागणी शहरवासीयांतून होत आहे.शहरवासीयांच्या अपेक्षानगरपालिकेत नवीन सभागृह अस्तित्वात आल्यापासून सुमारे ५७ कोटी रुपयांची भुयारी गटर योजना, त्यानंतर आता पाणीपुरवठा सक्षमीकरणासाठी शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून दीड कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला. त्यामुळे वर्षपूर्तीअगोदरच विकासकामांसाठी निधी मिळाला आहे. त्यामुळे दोन्ही आघाड्यांनी शहराच्या विकासासाठी एकत्र येण्याची गरज आहे.

टॅग्स :Waterपाणीwater transportजलवाहतूक